–II ● विवेक विचार ● II– सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६४ वा दिवस

–II ● विवेक विचार ● II–

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६४ वा दिवस

           श्रीरामकृष्णांनी (ठाकूरांनी) कधीही कोणाविरुद्ध कटू, कठोर शब्द उच्चारला नाही. त्यांची परमतसहिष्णुता इतकी अद्भुत होती, त्यांचे हृदय इतके विशाल होते की, प्रत्येक पंथाच्या लोकांना वाटे की ते त्यांच्याच पंथाचे आहेत. ते सर्वांवरच निःस्वार्थ प्रेम करीत. त्यांच्या दृष्टीने सर्वच धर्म खरे व सत्य होत. ते म्हणत की, धर्मजगतात प्रत्येक धर्माला स्थान आहे. सर्वच धर्माना स्थान आहे. ते मुक्त होते, पण सर्वांप्रती समान प्रेमातूनच त्यांचे मुक्तत्व प्रकट होत असे, वज्रासारख्या कठोरपणामधून नव्हे. असल्या कोमल कोटीतील व्यक्तीच नवीन भाव, नवीन आदर्श, नवीन तत्व निर्माण करीत असतात. आणि ‘आरडाओरडा’ करणाऱ्या कोटीतील लोक ते भाव, ते आदर्श चोहीकडे पसरवीत असतात.

                                     स्वामी विवेकानंद… 

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*

*★ भारतीय सौर श्रावण २५ शके १९४८*

★ श्रावण शुध्द /शुक्ल ४

★ शालिवाहन शके १९४८

★ शिवशक ३५१

★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७

★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३

★ रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६

★ १८८६ स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस (ठाकूर) तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली.

★ १९५७ महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा जन्मदिन.

★ २०१८ माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन.

★ ठाकूरांच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन.

संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *