–II ● विवेक विचार ● II–

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६५ वा दिवस

          हिंदुस्तानचे पुनरुत्थान होणारच. ते विजयपदी विराजमान होणारच. पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बळाने! संहाराचा उन्मत ध्वज घेऊन नव्हे, तर शांती आणि प्रीती यांचा, संन्यासवस्त्रांचा अरुण उज्वल रंगाचा ध्वज मिरवत! स्वतः मधल्या देवत्त्वाला आवाहन करा. मग क्षुधा, तृष्णा, शितोष्णादी सुखदुःखे तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. विलासमय प्रसादात सारी सुखे पायाशी हात जोडून उभी असताना चवीला आपली थोडी धर्मचर्चा करावी, हा हिंदुस्थानचा स्वभाव नाही. हिंदुस्तान धर्माकडे अधिक सखोलपणे गांभीर्याने पाहतो. सदैव त्यागाला सिद्ध राहा, श्रेष्ठता प्राप्त करा, त्यागावाचून श्रेष्ठ कार्ये सिद्धीस जात नाहीत. सर्व सुखविलास उपभोग, कीर्ती, प्रतिष्ठा आणि मानमरातब यांना तिलांजली द्या. स्वतःच्या तन-मन-धन जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा, की ज्यावरून लक्षावधी लोक भवपार जातील.

                             स्वामी विवेकानंद…     

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*

*★ भारतीय सौर श्रावण २६ शके १९४८*

★ श्रावण शुध्द /शुक्ल ५

★ शालिवाहन शके १९४८

★ शिवशक ३५१

★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७

★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३

★ सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२६

★ नागपंचमी

★ प्रथम श्रावण सोमवार

★ शिवमुठ – तांदूळ

★ १६६६ छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेतून सुखरुप पसार झालेत.

★ १९०९ क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी, स्मृतीदिन.

संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *