गोविंद नगर येथील अपघातानंतर मनपा प्रशासनाने घेतील गंभीर दाखल

खाद्यपदार्थाचे टपरी जेसीबी द्वारे जमीन उद्धवस्त केल्यानंतर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ फलक उभारण्यात आले. 

 
सिडको प्रतिनिधी/: इंदिरानगर बोगद्याकडून आरडी सर्कल, सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फोर्च्यूनर गाडीने (दि. १६ रोजी) दिलेल्या धडकेत इंदिरानगर येथील रहिवासी व शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर (वय ३८) यांचा मृत्यू झाला होता तर या धडकेत काही जण गंभीर जखमी झाले होते.

नवीन नाशिक मनपा अतिक्रमण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत धडक कारवाई करत या रस्त्यावरील अनधिकृत पणे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. मा उपायुक्त डॉ. मयूर पाटील यांच्या आदेशानुसार व सिडको विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नाशिक विभागातील गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक लगत खाद्यपदार्थाचे सुमारे ३ ते ४ टपरी जेसीबी द्वारे जमीनउद्धवस्त करण्यात आली होती.   

आज याठिकाणी ‘ना फेरीवाला क्षेत्र’ फलक उभारण्यात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे व प्रकाश नाठे रवींद्र काथवटे मिलिंद ढोले मंदार परांडे यांच्याकडून हि कारवाई करण्यात आली.    

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *